गोपाळपूर येथे स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान उत्साहात!

पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तसेच स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) विभागामार्फत दि. २२ जुलै २०२६ रोजी गोपाळपूर येथे 'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' या स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


     कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गोपाळपूर येथून रीद्धी-सिद्धी गणेश मंदिरापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये सुमारे १.५ ते २ टन कचरा संकलित करण्यात आला असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या कार्यक्रमास गोपाळपूरचे ज्येष्ठ नागरिक दिलीप गुरव, पांडुरंग देवमारे, प्रशासक ग्रामपंचायत साईनाथ अडगटाळे, महसूल अधिकारी, विलास मस्के, उदय पवार, अरुण बनसोडे, राजेंद्र बनसोडे, सचिन आसबे, अतुल गुरव, लक्ष्मण लेंगरे, विक्रम आसबे, राहुल माने, गोपाळ म्हेत्रे, दिपक सूर्यवंशी, इकबाल कांबळे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतीश मांडवे, पॉलिटेक्निकचे प्रतिनिधी प्रा. अमेय भातलवंडे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, 

सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दिलीप गुरव यांनी स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. संजय मुजमुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना समाजसेवेची प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. एम. एम. पवार आणि डॉ. नीता तळवलकर यांनी केले. या अभियानाद्वारे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने समाजापुढे आदर्श निर्माण केला.


चौकट- भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्वेरीचे संस्थापक प्रा. डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली संस्थेतील एन.एस.एस. विभाग, स्वयंसेवक व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोपाळपूर येथे हे स्वच्छता अभियान आयोजित केलेले होते. या अभियानास संस्थेतील सर्व घटकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर न्यायालयात लोक न्यायालय अंतर्गत अनेक प्रकरण निकाली..पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण..!

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन..!

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूह २.०’ संपन्न!